Wednesday 21 May 2014

Nidharmiyata

I am not great, scientist or philosoper but i am intersted in it from childhood. But as my mother is very superstatious I am hearing on Puranas from birth and I was thinking they are true in straight meaning. As a part of religion there some verbs of Geeta had heard by me also.
Now to the point. Believe or not beilive Geeta is great philosophy and science if you understand it correctly and there is mainly two times word comes DHARMA. One is when the lord Shrikrishna says to the hero Arjuna that fighting is your Dharma means fighting is your nature and other is when he(Shrikrisha) says 'Sarva Dharman Parityagya Mam Ek Sharanam Vraj'. Here people thinks that Krishna tells Arjuna to sacrifies all his Dharmas. But that is not fact. Instead Krishna want to clear confusion of Arjuna about Dharmas and right Dharma is surrnder yourself to your real Guru. So Dharma is not religion and anything can not be Nidharmi(I don't know what secularism is but Nidharmi does not exist). Now to Dharmanirapekshata. If you say government should 'Dharmanirapeksha' you are saying that government should not care about their duty. Yes it should not fever any religion or race and everybody must agree with it. But this not mean government should Dharmanirapeksha. They must do their own duties.
Jay Hind, Jay Bharat!
(Note: Here in India came a fashon after so called independnce that saying we are nidharmi or dharmanirapeksha or secular. As i don't know what secularism is I am not saying more on it. But I want to aknowledge peoples about Dharmas and why anyone can not nidharmi.)

Wednesday 23 April 2014

Dharma and Adhyatma

Dharma and Adhyatma
Dharma does not mean religion or majhab. Inital meaning of dharma is acquired characters set or natural characteristic. But for social welfare ancient philosophers(Hrishis)had given meaning acquirable characters. So everything in universe has its own dharmas or "Swadharmas" Adhyatma came from 2 words Adhi and Atma. Adhi means existence and atma means selfness or liveness. According to ancient Indian Vidnyan(science which is experienceable) atma is everywhere in universe. One history I want to say here. Before law of conversation of mass and energy it was assumed that Energy and mass are not inter convertible. Before stating of the law by Einstein Vivekanand had said something that saying Energy and mass are inter convertible.

Friday 11 April 2014

स्त्रीश्च चरित्र पुरुषस्य भाग्यम

नेक स्वकथित विद्वानांचा चुकीचा समज आहे की पुराणकालीन सर्व नारी ह्या सती सावित्री होत्या व आता सत्शील नारी सापडणे दुर्मिळ आहे. पण मी थोडेसे पुराणग्रंथ वाचलेले असल्यामुळे मला हे माहीत आहे की अनेक हृषीपत्नी सुद्धा राजांवर किंवा परनरांवर मोहित झाल्या होत्या(उदा गणेश पुराणातील रुक्मांगद राजा). तरी स्त्रीश्च चरित्र पुरुषस्य भाग्यम म्हणतात ते काही खोटे नाही. असो.
आज हे लिहिण्याचे कारण म्हणजे माझ्या एका जुन्या मैत्रिणीच्या स्त्री पुरुष(नर नारी) समानतेच्या विचारांना ऐकून मनात आलेले विचार. तिचे असे म्हणणे होते की स्त्रीने जर भारतीय पेहेराव करायला हवा असेल तर पुरुषानेही भारतीय पेहेरावच केला पाहिजे जे मला परममान्य आहे. पण त्याच बरोबर तिचे दुसरे मत होते की पुरुषानेही पूर्ण पेहेराव केला पाहिजे(अर्थात सद्र्यासारखे  काहीतरी परिधान केलं पाहिजे). हे तिचे मत मी चुकीचे म्हणत नाही. पण नरनारी देहरचनेत(व वृत्तीतही) भिन्नता असल्यामुळे नराला एकाच लैंगीक अवयवाचे जास्त रक्षण करण्याची गरज असते तर पूर्ण विकसित नारीला दोन अवयवांची(हे वाचून लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण ती निसर्गाची व्यवस्था आहे). तसेच आजकालच्या समाज बदलांमुळे मुले नको तेवढे जागरूक झाले आहेत. त्यामुळे ज्यांना 'शील' रक्षण करायचे आहे त्या मुलीना/स्त्रियांना आज व्यवस्थीत पेहराव करण्याची गरज पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे(मुलांनी/नरांनी याचा अर्थ असा घेऊ नये की एखादी मुलगी/स्त्री अपुऱ्या/अव्यवस्थित कपड्यात आहे म्हणून त्यांनी तिच्याशी वाटेल तसं वागावं सुसंस्कृत मुलांची व पुरुषांची ही जवाबदारी आहे की त्त्यांचे रक्षण व्हावे)

Sunday 16 March 2014

होळीविषयक थोडेसे

होळीचा सण जेव्हा सुरू झाला त्यावेळी निश्चितच घनदाट वने होती. अशावेळी झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून वणवा पेटायचा. अशावेळी ते एक झाड तोडणे म्हणजे आजूबाजूच्या झाडांना वाचविणे होते. पण हे परंपरावादी लक्षात घेत नाहीत की अंधश्रद्धा निर्मुलक. ते म्हणतात झाडे तोडू नका तर हे म्हणतात इतरवेळचे काय? पण आधीच विकासाच्या नावाखाली एवढी जंगलतोड होत असताना, प्रदूषण वाढत असताना झाडे नष्ट करून होळी साजरी करणे हा कोणता शहाणपणा? आणि जे म्हणतात होळीसाठी वृक्षतोड करू नका ते कोणत्या प्रकारची झाडे लावतात हेही त्यांनी सांगावे(वड, पिंपळ यासारखी की अकेसिया सारखी?केवळ हिंदुंचा सण आहे म्हणून विरोध नको.) होळी साजरीच करायची असेल तर झाडाच्या काही फांद्या तोडूनही साजरी करता येईल त्यासाठी अख्ख झाड तोडण्याची काहीच गरज नाही. होळीत दारू पिऊन धिंगाणा घालणे हाही काही धर्म नव्हे(मी आजपर्यन्त कधीही कोणाला रंगविले नाही की वृक्षतोड करून होळी पेटविली नाही.)
अनिसविषयी थोडेसे
अनिसवाले अनेकवेळा सांगतात की व्रतासाठी झाडाच्या फांद्या तोडू नका. पण असं सांगणाऱ्या मुर्खाना हे माहित नाहीये की झाडाच्या काही फांद्या कापल्या तर अधिक जोमाने फांद्या येतात(मी काजुंचे जंगल व बाग यामध्ये राहतो त्यामुळे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहे).
आजच्याकरीता एवढेच.
जय हिंद, जय भारत(जयतु जयतु हिंदू राष्ट्रं)!

Wednesday 12 March 2014

Fuzzy Logic in Bhagvata

The avtara of Nrusinha is good example of fuzzy logic. Brahma kept fuzzy logic in mind. So he devote Hiranyakashyapu as his wish.

गरज स्त्रीशक्ती जागृतीची

केवळ स्त्रियाच अबला नसतात. तर अनेक पुरुषही अबला असतात. परंतु मध्य युगात अबला म्हणजे स्त्री असा हेतुपुरस्कर गैरसमज पसरविण्यात आला. तरी जिजामाता, राणी चन्नम्मा, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यासारख्या अनेक शूर स्त्रीया त्याही काळात झाल्या.
मान्य आहे स्त्रीया शारिरीकदृष्टया काहीशा कमजोर असू शकतात. पण मानसिकदृष्टया त्या कणखर असतात असे science सांगते. स्त्रीया आदरणीय राहाव्यात, संरक्षित राहाव्यात म्हणून त्यांवर काही बंधने आणली गेली. पण समाज त्याचा गैरवापर करत आहे व कुठेतरी तूच सांभाळून राहा. प्रत्येक पुरुष हा असाच असणार असे मनावर बिंबवत आहे. धर्माच्या नावावर स्त्रीशक्तीला कमजोर बनवत आहे.
पतिव्रता हा स्त्रीचा धर्म आहे हे मला मान्य आहे पण जर पती व्रती असेल तरच. अधर्मी दुराचार्याची पत्नी जर पतिव्रता बनली तरी शेवटी राष्ट्राचे नुकसानच होते(पतिव्रता म्हणजे पतीसेवा हेच व्रत व पती हाच परमेश्वर असे मानणारी. तीच्या लैंगीक वर्तनाशी मी पातिव्रत्याचा संबंध लावत नाही) तर पतीच्या हितासाठी, कुलाच्या हितासाठी शील पणाला लावणारी अनसूया सर्वाधीक पतिव्रता ठरते.
मूळ मुद्दा असा आहे आजच्या काळात स्त्री केवळ पतिव्रता असून चालणार नाही. किंबहुना ती पतिव्रता असण्यापेक्षा राष्ट्रासाठी, धर्मशील निर्व्यसनी शाकाहारी समाज बनविण्यासाठी लढायची तयारी असलेली हवी. केवळ स्वसंरक्षणच नव्हे, समाजातील राक्षसांचा, राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी दुर्गावतार, चंडीअवतार धारण करणारी हवी.

Monday 10 March 2014

स्वजातीला प्राधान्य द्या.

मी कर्माने नसलो तरी जन्माने कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण आहे. आणि माझ्या जातीची मला अजिबात लाज वाटत नाही. उलट मी परमेश्वराला धन्यवाद देतो की त्याने मला निदान मांसाहार न करणाऱ्या घराण्यात जन्म दिलान.(पुढला जन्म मला गरीब का होईना पण गुजराथी/मारवाडी(राजस्थानी) शाकाहारीच घराण्यात मिळावा अशी इच्छा आहे.)
असो आता मुद्याकडे वळतो. आजकाल मुलींमध्ये एक fad आलंय ते म्हणजे इतरजातीय मुलाशी लग्न करण्याचं. ह्या मुली(किंवा आईबाप)  एखाद्या गरीब ब्राम्हण मुलाला नाकारतात पण ह्याच मुली अतिशय खालच्या स्तराला काम करणाऱ्या इतरजातीय मुलाशी लग्न करतात.(माझी सख्खी बहीणही यामध्ये आहे.) मी म्हणतो जन्माने नाहीतरी निदान कर्माने(ज्ञानाधारित व फक्त शाकाहारी) तुमच्या जातीचा आदर करणाऱ्या मुलाशी लग्न करा.(जन्मब्राम्हनापेक्षा कर्माला प्राधान्य द्यावे)एवढी चांगली मुले असताना याना घाणीत जाण्याची एवढी हौस का याचं कारण शोधताना मला एक प्रमुख कारण सापडलं ते म्हणजे चित्रपट व देवयानी सारख्या मालिका व तथाकथित ब्राह्मण समाजाची झालेली संकुचित मानसिकता. कारण एखादी मुलगी चुकली किंवा तशी तिच्यावर सक्ती करण्यात आली तर तिचे शुद्धीकरण करून तिला नव्याने सुरवात करायला उत्तेजन देण्याची अजूनही आपली मानसिकता नाही. उलट जबरदस्तीने का होईना तीने गेलेल्या घरासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग करावा म्हणजे ती धन्य होईल असा असलेला समज.
आता थोडे देवयानीविषयी. पुराणात जी देवयानी आहे ती शुक्राचार्यांची(राक्षसांचे गुरू) मुलगी. तीला कचाचा शाप असतो की तीचे ब्राम्हण मुलाशी लग्न होणार नाही. आणि तीच ययातीला पती म्हणून स्वीकारते( मालिकेतील सम्राट सारखा ययाती तिच्यावर सक्ती करत नाही ). तरी तुरळक अपवाद(बालक-पालक, उंच माझा झोका) वगळता चित्रपट/मालिका बनविणारे समाजाचे प्रबोधन करण्यापेक्षा लोकांना वेडे बनवून पैसा कमावण्यात धन्यता मानतात. त्यामुळे निदान जन्मब्राम्हनानी तरी या चित्रपट/मालिकांवर बहिष्कार करून कर्मब्राम्हण होण्याच्या दिशेने पाऊल टाकावं ही विनंती.

Saturday 8 March 2014

खरे संत कोण?(साईबाबा, mother तेरेसा की राजीव दिक्षित?)

मांसाहार करणारे साईबाबा, mother तेरेसा जर संत असतील तर राजीवजीना का संत म्हणू नये? त्यांनी लग्न केलं नाही, धनसंचय केला नाही, प्रसिद्धीपरान्द्ग्मुख राहून राष्ट्रीयतेचा प्रसार केला. ते कदाचित खोटे बोलले असतील पण धर्मासाठी, राष्ट्रासाठी खोटे बोलणे माफ करायलाच हवं. आणि मला खात्री आहे की साईबाबा, mother तेरेसाही नक्कीच कधीना कधी खोटे बोलले असणार. पण राजीवजी विद्वान होते. त्यांनी IIT मधून B. Tech केलं आणि मुख्य म्हणजे तर्क, अनुभवाच्या (माझ्या) कसोटीवर त्यांची व्याख्याने खरी ठरतात.
मी साईबाबा, mother तेरेसा यांना देव किंवा संत तर मानत नाहीच शिवाय सत्पुरुष किंवा सद्स्त्रीही मानत नाही. मी अंधविश्वासू आहे. पण आता superstatius राहिलो नाही.

गुरुकुल शिक्षण पद्धती(माकॅल्ले(macalay) आणि कॉन्वेंट(convent) पेक्षा खूपच सरस)

 गुरुकुल शिक्षण पद्धती हीच खरी भारतीय शिक्षण पद्धती आहे ज्यामधे राजाचा मुलगा असो की गरीबाचा, सर्वांना एकत्रीत शिक्षण दिले जायचे. यात केवळ पाठांतरच नसे तर प्रत्यक्ष(प्रक्टिकल) शिक्षण(उदा. धनुर्विद्या, अस्त्रविद्या, कृषिविद्या) यांचाही समावेश होता. अध्यात्म हे तर उर्जाशास्त्र(energetics) आहे.
 परंतु परकीय आक्रमकांनी विशेषत: इंग्रजांनी ही शिक्षण पद्धती नष्ट केली आणि माकॅल्ले(macalay)ने अशी शिक्षण(?)पद्धती(?) निर्माण केली. ज्यामुळे भारतीय अनुवांशिकतेने भारतीय असतील पण विचाराने इंग्रज असतील. जी अजूनही चालू आहे.
 कॉन्वेंट(convent) ही युरोपमध्ये आईबापांनी फेकलेल्या मुलांसाठी असलेली शिक्षण पद्धती. आपण मात्र(मी नाही) कॉन्वेंट(convent)मधे मुलांना पाठविणे प्रतीष्टीचे समजतो.(जर कधी तशी वेळ आलीच(म्हणजे मी बाप झालोच) तर कॉन्वेंट(convent)मधे माझ्या मु(ला/ली)ला पाठविण्यास सक्तः विरोध असेल.)

मानवीय आहार:- फक्त्त शाकाहार

मांसाहाराचे अनेक तोटे आहेत. मांसाहारामुळे माणसाची मानसीकता बदलते. अनेक व्याधींचे कारण अति मांसाहार आहे.काही वैद्य(physian) लोक प्रथिने व जीवनसत्वे यासाठी मांसाहाराची शिफारस करतात. पण ते शाकाहारातूनही मिळतात. हत्ती, घोडे हे प्राणी शाकाहारी आहेत जे सर्वात शक्तिशाली आहेत. खरेतर पशुपक्ष्यांची हत्त्या करून त्यांची प्रेते आपल्या पोटात पुरणे हा नैतिक दृष्ट्या निसर्गाचा मोठा गुन्हा आहे कारण निसर्गाने आपले शरीराला उपयुक्त असा शाकाहार दिला आहे. तसेच आपण दूध वगैरे पिऊ शकतो जे गाईना, म्हशीना असतं जे त्यांच्या वासरांना पिण्यासाठी पुरूतच. व त्याहूनही जास्त असतं. मांसाहार हा अतिशय क्रूरतेने केला जातो जे हिटलरलाही पटल नाही म्हणून तो शाकाहारी होता.

प्रेम की आकर्षण?

चित्रपटांमुळे सर्वात बदनाम झालेली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे प्रेम. चित्रपटातील नायक नायिकेतील प्रणय प्रसंग पाहून तरुणतरुणी आकर्षणालाच प्रेम समजतात आणि अनेकवेळा चुका करतात. मग कसेतरी नाते निभावतात. तर काही वेळा प्रेमाच्या नावाखाली मुलीना ठार मारण्याचे, विद्रूप करण्याचे प्रकारही होतात. पण खऱ्या प्रेमात आपण समोरच्या सुखात सुख व दु:खात दु:ख मानतो व तिला/त्याला काय आवडते याचा विचार करतो.
तरुण वयात भिन्न लैंगिक व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. व या आकर्षणातून प्रेमही निर्माण होते. परंतु आकर्षणाला प्रेम समजणे सर्वथा चुकीचे आहे. व जीच्यावर प्रेम(?) आहे अशा व्यक्तीला त्रास होईल असे वागणे हा गुन्हा आहे. पण काही वेळा असेही घडते की आपल्याला तिला त्रास द्यायचा नसतो पण तीचा मात्र गैरसमज झालेला असतो. अशावेळी तीला कसं पटवून द्यावं की माझ मन तिच्याकडे ओढ घेतंय, पण मला तीला t  हा मला पडलेला प्रश्न आहे.

Monday 3 March 2014

मूर्तिपूजा का करावी?

अनेकजण मूर्तीपूजा करतात ते देवाने आपल्या आकांक्षा पूर्ण कराव्यात. त्यांची देव म्हणजे दुसऱ्या ग्रहावर किंवा आकाशात काहीतरी आहे अशी काहीतरी समजूत असते.केवळ मूर्तीला वाहिले तर ते त्यापर्यंत पोहोचेल असा गोड गैरसमज असतो. हे सर्व काहीजणांना न पटल्याने ते मूर्तीपूजा करीत नाहीत.
खरेतर देव,परमेश्वर, परमात्मा, भगवान ही भिन्नभिन्न तत्वे आहेत. वेगवेगळ्या देवता म्हणजे वेगवेगळी तत्वे आहेत. ह्या तत्वांना समजून त्यांची कृपाप्रप्ती होण्यासाठी मूर्तिपूजा केली पाहिजे. आपल्या कर्तृत्वाला मर्यादा आहेत. त्यामुळे अदृश्य शक्तींचा आधार घेण्यासाठी मूर्तीपूजा जरूर करावी. परंतु परमात्म्याला त्या मूर्तीत सीमित समजू नये. सर्व जीवजंतू सुखी राहावेत अशी इच्छा करणे हाच खरा परमार्थ!मूर्तीवर उगाच उपचारांचे ओझे करू नये असे मला वाटते.

Tuesday 25 February 2014

चित्रपट, मालिका व क्रिकेट, पायचेंडू यासारख्या खेळामूळे होणारी धर्महानी!


चित्रपट, TV यासारख्या साधनांची निर्मिती करण्यात आली तेच मुळी लोकांना विचार करण्यापासून थांबविण्यासाठी. Oh My God सारख्या तुरळक चित्रपटातून धर्म म्हणजे काय हे सांगितलय पण ते शेवटी. इतरवेळ फक्त्त सांप्रदायिक(मुस्लीम, ख्रिस्ती) व भारतीय वेशभूषा करणाऱ्यांची टर उडविण्यावर खर्च केलेला आहे. तरीपण धर्म म्हणजे काय हे कळण्यासाठी हा चित्रपट एकदा जरूर पाहावा(रामायण, महाभारत यासारख्या पुराणांवरील चित्रपट, मालिकांनी धर्म समजावण्यापेक्षा अंधविश्‍वास वाढवण्याचेच काम केलं). अनेक चित्रपटातून धर्मदास या नावाची अधर्मी व्यक्तिरेखा रंगवलीय. ठाकूर, मुनीम, बनिया यासारख्या शाकाहारी प्रजातींची प्रतिमा बदनाम केली गेली आहे. आंतरजातीय लग्ने करण्याचे प्रमाणही वाढलेय. बहुतांशी अभिनेते, अभिनेत्र्या अधर्मी आहेत. काही गुन्हेगारांना मदत करणारेही आहेत.
आता वळतोय क्रिकेटकडे. क्रिकेट एक खेळ म्हणून मलाही आवडतो. पण आधुनिक क्रिकेट हे सत्धर्माचे नुकसान करणारे आहे कारण क्रिकेट, पायचेंडूचे चेंडू गोचर्मापासून  बनविले जातात. मैदानेही अधर्माने तयार केली जातात. क्रिकेटसाठी लाकूड लागते म्हणजे वृक्षतोडही आलीच(एरवी स्वतःला पर्यावरणप्रेमी म्हणविणारे याची कधी दखल घेतील का?) बहुतांशी खेळाडूही अधर्मी आहेत व गुन्हेगारांना मदत करणारेही आहेत.
एकूण काय तर चित्रपट, मालिका(यामध्ये तथाकथित सत्यता प्रदर्शनही समन्वित आहे) व क्रिकेट, पायचेंडू पाहून आपण आपला पैसा, मौल्यवान वेळ वाया घालवतो व अधर्म्याना मदत करतो. हा वेळ आपण सामूहिक उपासना, ध्यानधारणा, सामूहिक धर्मचिंतन यासारख्या चांगल्या कार्यांसाठी वापरून ऐहिक सुख व पारमार्थिक समाधानही मिळवू शकतो. लक्ष देऊन वाचल्याबद्दल आभार!

विकास:-एकांगी की शाश्वतं?

पूर्वराष्ट्रपती सर्वपल्ली यांनी साम्यवादी रशियनन अध्यक्षांना केलेला प्रश्न मला आठवतोय, महाशय घोड्याप्रमाणे वेगाने जमिनीवर धावू शकता व आकाशात पक्षाप्रमाणे उडू शकता पण माणसाप्रमाणे वागायला शिकलात का? आपलीही विचारसरणी तशीच (रशियाच्या अध्याक्षांप्रमाणे) झालीय. मोठमोठे बंगले, गाड्या, गाड्गेत्स, राजमार्ग, विमानतळ झाले म्हणजे विकास झाला असा गैरसमज झालाय. त्याचवेळी आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आपण यंत्रावलंबी व यंत्रवत झालो आहोत. केवळ ऐहिक सुख म्हणजे विकास असा जडवादी समाज आपण बनवितो आहोत. पण माणसाला केवळ ऐहिक सुख मिळून समाज सुखी होणार नाही. समाजामध्ये बौद्धिक व वैचारिक प्रगल्भता यावी लागते नाहीतर विकास हा एकांगी असतो व संपूर्ण समाजाला  सुखी करू शकत नाही. याचमुळे पाश्चात्य समाज अध्यात्माकडे व भारतीय शास्त्रांकडे वळत आहेत. लक्षपूर्वक वाचल्याबद्दल आभारी आहे. 

Saturday 15 February 2014

बालक पालक आणि वस्तुस्थिती!

आपल्या संस्कृतीने चार पुरुषार्थ निर्धारित केले आहेत ते म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष. याचाच अर्थ ऐहिक सुख(काम) प्राप्त  करणे हाही आपला धर्म आहे. ऐहिक सुखापैकी एक महत्वाचे असते ते म्हणजे लैंगीक सुख. पण कोणतेही सुख निकोपीरित्या  उपभोगण्यासाठी संयमाची आवश्यकता असते म्हणून कोणते सुख कसे घ्यावे याचे निर्बंधही संस्कुतीने घालून दिले आहेत याबद्दल वाचकांचे दुमत नसावे.
परंतु काही निर्बंध आहेत याचा अर्थ ते सुख घेणे वाईट आहे असा होत नाही. परंतु कालौघात धार्मिक ग्रंथात बदल घडविण्यात आले. तसेच परकीयांनी भारतीय समाज पौरुशहीन व्ह्वावा म्हणून काही समाजात अपसमज पसरविले त्यापैकी लैंगीक सुख हे अतिशय हिणकस सुख आहे. आपणही ते खरे मानले त्यामुळेच त्याची माहिती घेणे, देणे हेही तथाकथित सुसंकृत धार्मिक लोकांना पाप वाटू लागले. परंतु लैंगीक सुखाची इच्छा नैसर्गिक असल्यामुळे ती सजीव असेपर्यंत राहणारच.परंतु हे मान्य करणे आपणास अवघड लागले त्यामूळे मुलामुलींमध्ये वय होताच ह्या भावना तर जागृत होत होत्याच पण पूर्वी एवढी साधने नव्हती. परंतु नवीन तंत्राबरोबर ही माहिती मिळवणे सुकर झाले. आणि ती तशी घेऊही लागले जो बालकपालकचा विषय आहे. अशावेळी पालकांनी सावध होऊन आपली मुले/मुली चुकीची वाट पकडून ही माहिती मिळवणार नाहीत व त्यांना योग्य रीतीने ही माहिती कशी देता येईल यावर फार विचार करण्याची गरज आहे. बालकपालकचे सत्य नाकारल्यास नुकसान आपलच(आणि आपल्या मुलांचे) आहे हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. आपला मुलगा त्यातला नाही(मला फक्त मुलच माहिती आहेत/ मुलीही पाहतात असे केवळ ऐकलं आहे) अशा भ्रमात कोणीही राहू नये ही विनंती
थोडक्यात मी इतकेच म्हणेन लैंगिक इच्छा ही LPG सारखी असते योग्य प्रकारे न हाताळल्यास मोठा विध्वंस करू शकते.