Wednesday 12 March 2014

गरज स्त्रीशक्ती जागृतीची

केवळ स्त्रियाच अबला नसतात. तर अनेक पुरुषही अबला असतात. परंतु मध्य युगात अबला म्हणजे स्त्री असा हेतुपुरस्कर गैरसमज पसरविण्यात आला. तरी जिजामाता, राणी चन्नम्मा, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यासारख्या अनेक शूर स्त्रीया त्याही काळात झाल्या.
मान्य आहे स्त्रीया शारिरीकदृष्टया काहीशा कमजोर असू शकतात. पण मानसिकदृष्टया त्या कणखर असतात असे science सांगते. स्त्रीया आदरणीय राहाव्यात, संरक्षित राहाव्यात म्हणून त्यांवर काही बंधने आणली गेली. पण समाज त्याचा गैरवापर करत आहे व कुठेतरी तूच सांभाळून राहा. प्रत्येक पुरुष हा असाच असणार असे मनावर बिंबवत आहे. धर्माच्या नावावर स्त्रीशक्तीला कमजोर बनवत आहे.
पतिव्रता हा स्त्रीचा धर्म आहे हे मला मान्य आहे पण जर पती व्रती असेल तरच. अधर्मी दुराचार्याची पत्नी जर पतिव्रता बनली तरी शेवटी राष्ट्राचे नुकसानच होते(पतिव्रता म्हणजे पतीसेवा हेच व्रत व पती हाच परमेश्वर असे मानणारी. तीच्या लैंगीक वर्तनाशी मी पातिव्रत्याचा संबंध लावत नाही) तर पतीच्या हितासाठी, कुलाच्या हितासाठी शील पणाला लावणारी अनसूया सर्वाधीक पतिव्रता ठरते.
मूळ मुद्दा असा आहे आजच्या काळात स्त्री केवळ पतिव्रता असून चालणार नाही. किंबहुना ती पतिव्रता असण्यापेक्षा राष्ट्रासाठी, धर्मशील निर्व्यसनी शाकाहारी समाज बनविण्यासाठी लढायची तयारी असलेली हवी. केवळ स्वसंरक्षणच नव्हे, समाजातील राक्षसांचा, राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी दुर्गावतार, चंडीअवतार धारण करणारी हवी.

No comments:

Post a Comment