Tuesday 25 February 2014

विकास:-एकांगी की शाश्वतं?

पूर्वराष्ट्रपती सर्वपल्ली यांनी साम्यवादी रशियनन अध्यक्षांना केलेला प्रश्न मला आठवतोय, महाशय घोड्याप्रमाणे वेगाने जमिनीवर धावू शकता व आकाशात पक्षाप्रमाणे उडू शकता पण माणसाप्रमाणे वागायला शिकलात का? आपलीही विचारसरणी तशीच (रशियाच्या अध्याक्षांप्रमाणे) झालीय. मोठमोठे बंगले, गाड्या, गाड्गेत्स, राजमार्ग, विमानतळ झाले म्हणजे विकास झाला असा गैरसमज झालाय. त्याचवेळी आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आपण यंत्रावलंबी व यंत्रवत झालो आहोत. केवळ ऐहिक सुख म्हणजे विकास असा जडवादी समाज आपण बनवितो आहोत. पण माणसाला केवळ ऐहिक सुख मिळून समाज सुखी होणार नाही. समाजामध्ये बौद्धिक व वैचारिक प्रगल्भता यावी लागते नाहीतर विकास हा एकांगी असतो व संपूर्ण समाजाला  सुखी करू शकत नाही. याचमुळे पाश्चात्य समाज अध्यात्माकडे व भारतीय शास्त्रांकडे वळत आहेत. लक्षपूर्वक वाचल्याबद्दल आभारी आहे. 

No comments:

Post a Comment