Tuesday 25 February 2014

चित्रपट, मालिका व क्रिकेट, पायचेंडू यासारख्या खेळामूळे होणारी धर्महानी!


चित्रपट, TV यासारख्या साधनांची निर्मिती करण्यात आली तेच मुळी लोकांना विचार करण्यापासून थांबविण्यासाठी. Oh My God सारख्या तुरळक चित्रपटातून धर्म म्हणजे काय हे सांगितलय पण ते शेवटी. इतरवेळ फक्त्त सांप्रदायिक(मुस्लीम, ख्रिस्ती) व भारतीय वेशभूषा करणाऱ्यांची टर उडविण्यावर खर्च केलेला आहे. तरीपण धर्म म्हणजे काय हे कळण्यासाठी हा चित्रपट एकदा जरूर पाहावा(रामायण, महाभारत यासारख्या पुराणांवरील चित्रपट, मालिकांनी धर्म समजावण्यापेक्षा अंधविश्‍वास वाढवण्याचेच काम केलं). अनेक चित्रपटातून धर्मदास या नावाची अधर्मी व्यक्तिरेखा रंगवलीय. ठाकूर, मुनीम, बनिया यासारख्या शाकाहारी प्रजातींची प्रतिमा बदनाम केली गेली आहे. आंतरजातीय लग्ने करण्याचे प्रमाणही वाढलेय. बहुतांशी अभिनेते, अभिनेत्र्या अधर्मी आहेत. काही गुन्हेगारांना मदत करणारेही आहेत.
आता वळतोय क्रिकेटकडे. क्रिकेट एक खेळ म्हणून मलाही आवडतो. पण आधुनिक क्रिकेट हे सत्धर्माचे नुकसान करणारे आहे कारण क्रिकेट, पायचेंडूचे चेंडू गोचर्मापासून  बनविले जातात. मैदानेही अधर्माने तयार केली जातात. क्रिकेटसाठी लाकूड लागते म्हणजे वृक्षतोडही आलीच(एरवी स्वतःला पर्यावरणप्रेमी म्हणविणारे याची कधी दखल घेतील का?) बहुतांशी खेळाडूही अधर्मी आहेत व गुन्हेगारांना मदत करणारेही आहेत.
एकूण काय तर चित्रपट, मालिका(यामध्ये तथाकथित सत्यता प्रदर्शनही समन्वित आहे) व क्रिकेट, पायचेंडू पाहून आपण आपला पैसा, मौल्यवान वेळ वाया घालवतो व अधर्म्याना मदत करतो. हा वेळ आपण सामूहिक उपासना, ध्यानधारणा, सामूहिक धर्मचिंतन यासारख्या चांगल्या कार्यांसाठी वापरून ऐहिक सुख व पारमार्थिक समाधानही मिळवू शकतो. लक्ष देऊन वाचल्याबद्दल आभार!

No comments:

Post a Comment