Friday 11 April 2014

स्त्रीश्च चरित्र पुरुषस्य भाग्यम

नेक स्वकथित विद्वानांचा चुकीचा समज आहे की पुराणकालीन सर्व नारी ह्या सती सावित्री होत्या व आता सत्शील नारी सापडणे दुर्मिळ आहे. पण मी थोडेसे पुराणग्रंथ वाचलेले असल्यामुळे मला हे माहीत आहे की अनेक हृषीपत्नी सुद्धा राजांवर किंवा परनरांवर मोहित झाल्या होत्या(उदा गणेश पुराणातील रुक्मांगद राजा). तरी स्त्रीश्च चरित्र पुरुषस्य भाग्यम म्हणतात ते काही खोटे नाही. असो.
आज हे लिहिण्याचे कारण म्हणजे माझ्या एका जुन्या मैत्रिणीच्या स्त्री पुरुष(नर नारी) समानतेच्या विचारांना ऐकून मनात आलेले विचार. तिचे असे म्हणणे होते की स्त्रीने जर भारतीय पेहेराव करायला हवा असेल तर पुरुषानेही भारतीय पेहेरावच केला पाहिजे जे मला परममान्य आहे. पण त्याच बरोबर तिचे दुसरे मत होते की पुरुषानेही पूर्ण पेहेराव केला पाहिजे(अर्थात सद्र्यासारखे  काहीतरी परिधान केलं पाहिजे). हे तिचे मत मी चुकीचे म्हणत नाही. पण नरनारी देहरचनेत(व वृत्तीतही) भिन्नता असल्यामुळे नराला एकाच लैंगीक अवयवाचे जास्त रक्षण करण्याची गरज असते तर पूर्ण विकसित नारीला दोन अवयवांची(हे वाचून लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण ती निसर्गाची व्यवस्था आहे). तसेच आजकालच्या समाज बदलांमुळे मुले नको तेवढे जागरूक झाले आहेत. त्यामुळे ज्यांना 'शील' रक्षण करायचे आहे त्या मुलीना/स्त्रियांना आज व्यवस्थीत पेहराव करण्याची गरज पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे(मुलांनी/नरांनी याचा अर्थ असा घेऊ नये की एखादी मुलगी/स्त्री अपुऱ्या/अव्यवस्थित कपड्यात आहे म्हणून त्यांनी तिच्याशी वाटेल तसं वागावं सुसंस्कृत मुलांची व पुरुषांची ही जवाबदारी आहे की त्त्यांचे रक्षण व्हावे)

No comments:

Post a Comment