खरं तर वस्त्र-प्रावरणं आणि त्यांचे आकार 'सभ्यते'ची मापदंड ठरु शकतात, 'संस्कृती'ची नाही. पण सध्या कुठेच संस्कृती शिल्लक नसल्यामुळे आपण सध्या सभ्यतेलाच संस्कृती समजू.
तर विषय असा आहे की कापड कापून शिवून घालणं ही आपली(भारतीय) संस्कृती नाही. कारण जम्मू-काश्मीर आणि हिमालय वगळता बहुतांश हिंदुस्थान उष्ण कटिबंधात येतो. त्यामुळे अधिक वस्त्र परिधान करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आणि उपयुक्तही नाही केवळ अति संवेदनशील अवय झाकण्यासाठी वस्त्र आवश्यक आहेत. तेही आपलं त्यांवर नियंत्रण असेल तर झाकण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे पंचा(धोती)/धोतर, उपरणं आणि साडी(सुती असल्यास अधिक चांगलं) हीच वस्त्र खरं तर आपल्या भूभागात योग्य आहेत, सदरा, विजार आदी नाही. परंतु आक्रमकांनी केवळ आपल्या भूभाग आणि संपत्तीवरच आक्रमण केलं असं नाही तर संस्कतीवरही केलं. आणि त्यातूनच विविध कापून शिवलेली वस्त्रे परिधान करण्याची सवय आपल्याला लागली. कागदोपत्री आपण स्वतंत्र आसलो तरी आपल्या गुणसुत्रातच कुदास्यता(गुलामी): भिनली असल्याने आपण आक्रमकांच्या परिधान पद्धतीला संस्कृती समजू लागलो आहोत.
संपूर्ण वाचण्यासाठी धन्यवाद!
जय सिंध, जय भारत, जय महाराष्ट्र!
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
No comments:
Post a Comment