Sunday, 19 April 2026

कर्ण और अश्वत्थामा: दोनों ही खलनायक

!भारत विरोधी बाये कम नहीं नीचों ने कर्ण को महान बताया तो कुछ 'बम मन' जन अश्वत्थामा को महान बताने लगे। परंतु कुछ अच्छाईयां तो भी दोनों खलनायक ही है।
कर्ण के दानी होने की बहुत चर्चा होती है। हो सकता है हो भी। परंतु द्रौपदी को नंगा करने का सुझाव उसी ने दिया था। अभिमन्यु को मारने भी उसका सक्रिय सहभाग था। अज्ञातवास में अर्जुन ने उसे ही नहीं बल्कि भीष्म, द्रोण सहित सभी को भगाया था। और बाये कम नहीं नीच उसे महान बताने है।
अश्वत्थामा ऋषि द्रोणाचार्य का संतान तो था, परंतु अपने वासनाओं पे नियंत्रण नहीं रख सका। ब्राह्मण कुल में जन्म लेने के बावजूद द्रोण और उसने अधर्म का केवल साथ नहीं दिया, परंतु स्वयं लडे ये तो अधर्म किया ही और अभिमन्यु और द्रौपदी के सुतो को भी मार दिया। इतना ही नहीं अश्वत्थामा ने तो गर्भ में पल रहे पांडवों के वंश को भी नष्ट करने का प्रयत्न किया। वो तो द्रौपदी की क्षमाशीलता थी इसलिए उसे जिंदा बक्षा गया।
द्रौपदी: सच्ची नायिका!
द्रौपदी के बारे में अनेक वदंताए फैलाई गयी उसमे एक है उसने दुर्योधन को अंधे का पुत्र अंधा कहा। परंतु मूल महाभारत में ऐसा कुछ नहीं है। ये नंबर के युरोपिय और उनके कम नहीं नीच मानसिक दासों(गुलाम) ने फैलाई हुई बातें है।
अंत तक पढ़ने वालों के आभार और धन्यवाद!
जय सिंध, जय महाराष्ट्र, जय शिवराय!
छत्रपति शिवाजी महाराज की जय!

वस्त्रप्रावरणं आणि संस्कृती(भाग २)!

जस जसा सभ्यतंचा विकास(?) झाला तस तसा परिधान पद्धतींचा विकास झाला. 'संवेदनशील अंग' झाकण्याबरोबरच ती उठून दिसावेत यासाठी 'मुली-महिला' वस्त्रप्रावरणं वापरू लागल्या. हळूहळू या पद्धती हिंदुस्थानातही आल्या. आफण कसंही काहीही परिधान करायचं आणि कुणाच्या दृष्टीत भरलं की दोष त्या दृष्टीला द्यायचा म्हणजे स्त्रीवादी असणं असं स्त्रीवादी असण्याचं नविन परिमाण जन्माला आलं. जन काहीही केलं तरी बोलतातच हे जरी सत्य असलं तरी मग या स्त्रिया जनांनी पहावं हा हेतू नसेल तर 'नको तिथं' आकर्षक बनविणारी आधुनिक वस्त्रप्रावरणं परिधान का करतात! बरं आरोग्यासाठी उपयुक्त हिंदू सनातनी वस्त्रप्रावरणंच आहेत, 'विकसित इंडिअन' नाहीत. पंघा(होती)-धोतर, उपरणं आणि महिलांकरिता सकच्छ नेसता येणारी साडी याहून सुटसुटीतही काही नाही. 'पण लक्षात घेतं कोण '! मानसिक दास्यत्व(गुलामी) संपेल ना! असो! विस्तार फार झाला.
शेवटपर्यंत वाचणाऱ्यांना आभार, धन्यवाद!
जय इंड, जय (अ)भारत, जय माकाखाल्ले(मेकाल्ले)!

वस्त्रप्रावरणं आणि संस्कृती(भाग १)!

खरं तर वस्त्र-प्रावरणं आणि त्यांचे आकार 'सभ्यते'ची मापदंड ठरु शकतात, 'संस्कृती'ची नाही. पण सध्या कुठेच संस्कृती शिल्लक नसल्यामुळे आपण सध्या सभ्यतेलाच संस्कृती समजू.
तर विषय असा आहे की कापड कापून शिवून घालणं ही आपली(भारतीय) संस्कृती नाही. कारण जम्मू-काश्मीर आणि हिमालय वगळता बहुतांश हिंदुस्थान उष्ण कटिबंधात येतो. त्यामुळे अधिक वस्त्र परिधान करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आणि उपयुक्तही नाही केवळ अति संवेदनशील अवय झाकण्यासाठी वस्त्र आवश्यक आहेत. तेही आपलं त्यांवर नियंत्रण असेल तर झाकण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे पंचा(धोती)/धोतर, उपरणं आणि साडी(सुती असल्यास अधिक चांगलं) हीच वस्त्र खरं तर आपल्या भूभागात योग्य आहेत, सदरा, विजार आदी नाही. परंतु आक्रमकांनी केवळ आपल्या भूभाग आणि संपत्तीवरच आक्रमण केलं असं नाही तर संस्कतीवरही केलं. आणि त्यातूनच विविध कापून शिवलेली वस्त्रे परिधान करण्याची सवय आपल्याला लागली. कागदोपत्री आपण स्वतंत्र आसलो तरी आपल्या गुणसुत्रातच कुदास्यता(गुलामी): भिनली असल्याने आपण आक्रमकांच्या परिधान पद्धतीला संस्कृती समजू लागलो आहोत.
संपूर्ण वाचण्यासाठी धन्यवाद!
जय सिंध, जय भारत, जय महाराष्ट्र!
छत्रपती शिवाजी महाराज की जय!

Wednesday, 1 April 2026

ब्रह्मचर्य आणि पातिव्रत्य: विकृत केलं गेलंल्या 'सं'कल्पना!

ब्रह्म आणि पातिव्रत्य या मूळ अतिशय उदात्त 'सं'कल्पना आहेत. पण त्यांना कैवळ मैथुनाशी निगडित करून विकृत केलं गेलं ब्रह्मचर्य याचा अर्थ खरं तर ब्रह्मात स्थित होणं असा आहे, मैथुन/संभोग न करणं अशा नाही. एकच पत्नी करून केवळ ऋतुस्नात असताना संभोग करणं हे ही ब्रह्मचर्य आहे. नियोग हे ही ब्रह्मचर्य आहे. केवळ संभोग नाही केला म्हणून कुणी ब्रह्मचारी/णी नसतो/ते. त्यासाठी आहार-विहालही 'सात्विक' असावा लागतो. 'भोग' वृत्ती त्यागाची लागते.
तरच ते खरं ब्रह्मचर्य!
अनेक जणी लफडं करायला न जमल्याने किंवा केवळ समाजात निंदा होईल या भीतीने पतिव्रता(?) असतात. परंतु पतिव्रतेने पतिच्या आधी उठावं, नंतर झोपावं, पतिशिवाय कुणाही नराचा विचार आणू नये हे पातिव्रत्याचे नियम आहेत, जे कलीयुगात पाळले जाणं अशक्यच आहे. पण आपलं मन स्विकारलेल्या पतीला वाहणं हेच खरं पातिव्रत्य! भावना पवित्र असली पाहिजे हे मुख्य आहे. काही कारणाने पतीच्या 'चिरकालिन' हितासाठी केली गेलेली पतीची फसवणूक हे ही पातिव्रत्य होतं असं मला वाटतं.

Sunday, 8 March 2026

धडपड ही आनंदासाठी!

 जीवाची धडपड ही सुखासाठी असते असं म्हणतात, पण कोणत्याही जीवाची धडपड ही खरं तर सच्चिदानंदासाडीच असते पण त्याला ते समजत नाही.
तुम्ही म्हणाल कसं! तर झवून घेण्यात/झवण्यात काही सुख असतं का! पोरांना जन्म देण्यात काही सुख असतं का! तर नाही, दुःखच असतं. पण जीवांना त्यातून क्षणिक का होईना आनंद मिळतो.
आता राक्षस जन मांसाहार करतात. हाडकं चघळण्यात कसलं आलंय सुख! पण त्यानं 'बल' वाढेल आणि आपण अजून आनंद घेऊ असं बिचाऱ्यांना वाटत असतं. आपण धर्म नाकारतो याचाही काही जणांना आसुरी आनंद मिळत असतो.
मी आता हे लिहित आहे, प्रेषणार आहे ते ही आनंदासाठीच. पण हा कोणताही आनंद सच्चिदानंद नाही. तो सत्य ज्ञानानेच मिळत असण्याची शक्यता आहे(माझा विश्वात नाही).
मराठी संत: संत की वैज्ञानिक!
महाराष्ट्र, मराठी भाषेला फार मोठी संत साहित्यिची परंपरा आहे ज्ञानदेवांनी भावार्थ दिपिका लिहीली, तुकारामांनी गाथा लिहिली, रामदासांचा दासबोध, एकनाथांनी एकनाथ भागवत ही ठळक उदाहरणं! या व्यतिरिक्तही अनेक संत अहेत. पण मी इतरांचं फारसं काही ऐकलं पण नाही. तर या सर्व ग्रंथात (मनो)वैज्ञानिक सिद्धांत आहेत. म्हणजे हे केवळ संत नसून वैज्ञानिक पण आहेत.

Saturday, 28 February 2026

परमात्मानुभव

शीर्षक जरी परमात्मानुभव दिलं असलं तरी एवढं मोठं जग आहे म्हणजे कुणी तरी त्याला निर्माता/ती असलं पाहिजे असले फालतू सिद्धांत(?) मांडण्याकरिता हे प्रेषण नाही. जे मानवी तर्क बुद्धीच्या 'पलिकडे' आहे त्याला तर्क बुद्धीनं कसं सिद्ध करणार!
डार्विनचा विकासवादाचा तथाकथित सिद्धांत मला नाकारायचा नाही. कारण जीवनाची उत्पत्ती कशी 'होते' याबद्दल वेद-पुराणातील मतांशी सुसंगत गृहीतकं आहेत ती! पण मला तुमच्या बुद्धीला थोडा ताण द्यायचा आहे. जरा विचार करा! समजून चलू काही पद्म वर्षांपूर्वी जीवन अस्तित्वात आलं, आणि काही लक्ष वर्षांनी ते संपेल. पण मग त्यापूर्वी आणि त्यानंतर काय! म्हणून आपलं भारतीय तत्त्वज्ञान सांगतं ब्रह्म अनादी अनंत आहे. चार युगं आहेत आणि ती सतत पुनरावृत्त होत आहेत. यापेक्षा तर्क पूर्ण मत काय असू शकेल!
धन्यवाद!

Sunday, 22 February 2026

परमात्मविचार!

!मला वाटतं आत्मा, परमात्मा हे शब्द कुणी तरी गुजराथी चिंतकांनी दिले असावेत. आत मा(मध्ये) असतो तो आत्मा असा तो विचार असावा. असो. मला आता त्यावर जास्त बोलायचं नाही आहे.
तर आत्मा म्हणजे काय तर सर्वांमध्ये असणारं एक तत्त्व! परमात्मा म्हणजे समुच्चित आत्मा! त्याला ब्रह्म किंवा चैतन्यही म्हटलं जातं. आत्मा हे आंग्ल भाषेतील सौल(soul)हून भिन्न आहे. सौल केवळ हुमन बेइंगमधे असतं असं त्यांचं(अब्राह्मिकांचं) मत आहे. पण चैतन्य निर्जीव समजल्या जाणाऱ्या गोष्टींचाही असतं. ही त्याची विशेषता आहे. मलं-मूत्र, निर्जीव(?) शरीर यांमध्ये ही चैतन्य असतंच पण आपण नाव दिलेलं चैतन्य नसतं.
मला वाटतं एवढं पुरेसं आहे. धन्यवाद!